Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २२ जून, २०२४

15 जून दैनंदिन शालेय परिपाठ

      15 जून दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना 

सर्वात्मका शिव सुंदरा, स्वीकार या अभिवादना...... १५ जून 


→ श्लोक 

- यः पठति लिखति पश्यति, परिपृच्छति पठितानुपाश्रयति तस्य दिवाकरकिरवैः नलिनीदलमिव विकाश्यते बुध्दिः । 

-  जो वाचन करतो, लिहितो, पाहतो (निरीक्षण करतो) प्रश्न विचारतो, विद्वानाच्या सहवासात राहतो. त्याची बुध्दी, सूर्याच्या किरणांनी कमळ फुलावे त्याप्रमाणे विकसित होते



. → चिंतन

 दुसऱ्यास सुखाची फुले दिली तरच सुखाचे अत्तर आपणास मिळेल. - आपण जेव्हा दुसऱ्याला सुखी करतो तेव्हा त्याला सुखी झालेले पाहून आपल्या मनालाही एक प्रकारचे दिव्य सुख मिळते. अशा रीतीने विचार करून जर प्रत्येक व्यक्ती वागू लागली, दुसऱ्यांच्या सुखासाठी धडपड करू लागली तर जगातील द्वेष, ईर्षा, हेवा-दावा ह्या साऱ्या हीन भावना नष्ट होतील आणि जिकडे तिकडे मांगल्याचे, स्नेहाचे वातावरण पसरेल. हे जाणून घेऊन प्रत्येकाने वागण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण जे पेरतो तेच उगवते हा मूलमंत्र लक्षात घ्यावा.


कथाकथन 

'जयंत विष्णु नारळीकर : (आध्यात्मिक दृष्टीकोन असलेला भारतीय वैज्ञानिक) पाश्चात्य संशोधकांनी जे शोध लावले त्यामागे व्यापार, यंत्रे, तंत्रज्ञान हाच पाया होता. त्यांचा युध्दसंभार, वसाहतवाद वाढविणे व भांडवलशाही समाजरचनेचा विकास प्रामुख्याने आढळतो. परंतु भारतीय संस्कृतीतील विश्वबंधुत्व, सत्य, अहिंसा आदि जीवनमूल्यांचा 'सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः' अशा 'मंगल भवतु सब्ब मंगलम्' या विश्वकल्याणकारी | भावनेचा अभावानेच साक्षात्कार होतो. श्री. जयंत विष्णु नारळीकर हे आजचे विश्वमान्य संशोधक याच ध्येयवादाने प्रेरित झालेले विख्यात शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे वडिल विष्णु वासुदेव नारळीकर हे रँग्लर होते. त्यांची आई श्री. कृष्णाजीपंत हुजुरबाजार यांची कन्या - संस्कृत विदुषी आहेत. अशा सुविद्य दांपत्याच्या पोटी ३१ जुलै १९३७ साली श्री. जयंतरावांचा जन्म झाला. जात्याच हुषार आणि सुसंस्कृत, बुद्धिमान, बनारस युनिव्हर्सिटीतून ते १९५८ साली. डी.एस.सी. झाले व त्या नंतर १९६० साली केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी बी. एस. एम. ए., पीएच. डी. असे उच्च शिक्षण घेतले. खगोलशास्त्रातील मानाचे टायसन पारितोषिक त्यांना मिळाले. १९५९ साली गणितशास्त्रात रँग्लर झाले. १९६२ साली स्मिथ्स पारितोषिकाचे मानकरी ठरले. विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी हॉईल, बॉडी व बार्निज़ या | शास्त्रज्ञांसमवेत स्थिरस्थिती विश्वाचा सिध्दांत त्यांनी मांडला. जयंतरावांनी त्याला गणिताचा आधार देऊन तो सिध्दांत सिध्द केला. विश्व स्थिर असले तरी ते आकुंचन प्रसरण पावते; पण एकंदरीने ते विकसनशील आहे, प्रसरण पावत आहे, हा सिध्दांत त्यांनी मांडला. श्री. नारळीकर यांच्या मते, विज्ञानाचा - मनाशी, बुध्दीशी संबंध आहे. विज्ञानातील अनेक सिध्द्धांत सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या व विज्ञान लोकप्रिय केले. भारतातील खगोलशास्त्रज्ञांसाठी त्यांनी 'इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स' या संस्थेची उभारणी केली. अनेक पुरस्कार मिळवूनही नम्र, सौजन्यशील, उदंड कीर्ती व लोकप्रियता लाभलेला हा भारतीय संशोधक अजूनही कार्यरत आहे. 


→ सुविचार

 •'जीवन किती वर्ष जगलात याला महत्व नाही, जीवन कसे जगलात याला महत्व आहे.'- रणजीत देसाई

 • 'सुख ही मनाची आंतरिक अवस्था आहे.'


दिनविशेष -

 • ना. ग. गोरे जन्मदिन - १९०७ : नानासाहेब गोरे एक थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि दिवास्वत होते. विधवेशी विवाह करून समाजाला आदर्श घालून देणारे ते कर्ते सुधारक होते. नानासाहेबांचा जन्म रत्नागिरीतील हिंदळे या गावी झाला. बी. ए. एलएल. बी. पर्यंत शिक्षण पुणे येथे पुरे केले. पुण्यातील पर्वती मंदिर अस्पृश्यता निवारण सत्याग्रहापासून समाजकार्यास सुरुवात केली. कॉग्रेस समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. १९६४ मध्ये प्रजासमाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. १९६७-६८ मध्ये पुण्याचे महापौरपदही त्यांनी भूषविले. १९५५ मध्ये झालेल्या गोया विमोचन चळवळीत त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. १ मे १९९३ रोजी त्यांचे पुणे येथे हृदयविकाराने निधन झा नानासाहेबांनी विपुल लेखनही केले आहे. 'समाजवादाचा ओनामा' हे त्यांचे पहिले पुस्तक, कारागृहाच्या भिंती', 'डाली', 'शंख आणि शिंपले', 'सीतेचे पोहे', 'गुलबक्षी', 'आव्हान आणि आवाहन', 'ऐरणीवरील प्रश्न' ही त्यांची गाजलेली पुस्तके, कालिदासाच्या मेघदूताचा समचंद अनुवाद, नेहरूंच्या आत्मचरित्राचा अनुवाद प्रसिध्द आहेत. बेडूकवाडी, चिमूताई घर बांधतात ही पुस्तके बालकांसाठी लिहिली. ते उत्तम वक्ते होते. रेखीव मांडणी, स्पष्ट विचार आणि |अभ्यासपूर्ण विवेचन ही त्यांच्या वैचारिक लेखनाची आणि भाषणांची वैशिष्ट्ये होती. 

 

→ मूल्ये

 स्वाधीनता, समता, कर्तव्यदक्षता, राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव, 

 

→ अन्य घटना

 • इंग्लंडच्या इतिहासात गाजलेल्या 'मॅग्नाचार्य' दर जॉन राजाने सही केली- १२१५ शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रेंकलीन यांनी पतंगाच्या साहाय्याने विद्युत प्रवाहाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. १७५२

  • श्री. पांडुरंग विनायक करमरकर यांनी वेणुबाई या विधवेबरोबर जाहीरपणे पुनर्विवाह केला १८६९

   • संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा स्मृतिदिन १९३१ ● बापुसाहेब घोरपडे यांचा जन्मदिन - १९१५

    • श्रीमती अॅनी बेझंट उटकमंड येथे स्थानबध्द १९१७ • जयंत नारळीकर यांनी गुरुत्वाकर्षणाविषयीचा सिध्दांत मांडला - १९६४ 

    

→ उपक्रम

 • बेडुकवाडी व इतर पुस्तके मिळवून वाचा राष्ट्र सेवा दलाची माहिती करुन घ्या.

 

 समूहगान 

 • झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडकत, वरी महान..... 

 

→ सामान्यज्ञान 

प. जर्मनीतील पपाळांच्या एका कंपनीने सौरऊर्जेवर चालणारे एक नवीन सीरपडचाळ तयार केले आहे. या घडयाळातील उपकरणे सेकंदाच्या हजाराव्या हिश्शापर्यंत अचूक वेळ दर्शवितात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा